औसा किल्ल्याचा अतिप्राचीन इतिहास….
Contact for consultation
– डॉ.संजीव लिंगवत, एम्. डी.
इतिहास अभ्यासक,वेंगुर्ले,सिंधुदुर्ग.
संपर्क: 9421268268.
परवा नांदेडचा मगधच्या नंद राजाची उपराजधानी असलेला नंदगिरी किल्ला पाहून , काल लोहा तालुक्यातील राष्ट्रकूट राजा तिसरा कृष्णदेवराय यांची राजधानी असलेला भव्य दिव्य किल्ले कंधार पाहिला . आणि आज अतिप्राचीन इतिहास असलेला औसा किल्ला पाहण्यासाठी लातूर मध्ये दाखल झालो.
औसा किल्ला हा महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचा भुईकोट किल्ला. हा किल्ला औसा शहराच्या दक्षिणेस सुमारे ३ किमी., लातूर शहरापासून २० किमी. तर उस्मानाबादपासून ५१ किमी. अंतरावर आहे.
औसा हे एक प्राचीन स्थळ असून त्याचा पहिला नामोल्लेख बदामीचा चालुक्य राजा विजयादित्य (६९६–७३३) याच्या बोरगाव ताम्रपटात ‘उच्छिव चत्वारिंशत’ या नावाने केलेला आढळतो.
राष्ट्रकूट व चालुक्य कालखंडात औसा हे दिगंबर जैनांचे दक्षिणेतील प्रमुख पीठ होते. राष्ट्रकूट सम्राट अमोघवर्ष प्रथम (इ. स. नववे शतक) याचा गुरू ‘जिनसेन’ या जैन पंडिताने या नगराचा ‘औच्छ’ असा उल्लेख केलेला आहे. राष्ट्रकूट काळातील प्रशासनव्यवस्थेत या नगराचा समावेश ‘मुरुम्ब’ (मुरूम) विषयात, तर कल्याणीच्या चालुक्य काळात ‘गज्जे-७००’ नामक प्रशासन विभागात होता. औसा येथे वास्तव्यास असणारे जैन पंडित ‘कनकामर’ विरचित करकंडचरिउ (११ वे शतक) या ग्रंथात या नगराचे ‘असाई नगरी’ असे नाव नमूद केले आहे. यादव सेनापती खोलेश्वर याच्या शके ११५० (इ. स. १२२८-२९) मधील अंबाजोगाई शिलालेखात ‘औस देश’ असा याचा उल्लेख आहे.
खरं तर सात विहिरी, सात दरवाजे, बावीस तोफा , चार महाल, दुहेरी तटबंदी असलेला या किल्यांच्या परिसर ३६ एकर आहे.यातील साधारण पंधरा एकरांवर हा किल्ला बांधलेला आहे.
काही ठळक ऐतिहासिक मुद्दे…
▪️सहाव्या शतकात कुंतल देशाच्या भाग असा, औसा सांगली, मिरज, धाराशिव ही शहरं अस्तित्वात होती.
▪️ सातव्या शतकात औसा शहरावर बदामीच्या चालुक्य राजाचे वर्चस्व होतं.
▪️ आठव्या शतकात कल्याण येथील राजा चालुक्य यांनी हा भाग ताब्यात घेतला.
▪️ आठव्या ते दहाव्या शतकात जैन राज्यकर्ते यांनी येथे राज्य केलं.
▪️ अकरा ते बाराव्या शतकात विजय नगर चे कृष्णदेवराय व कर्नाटकातील हैदरबान यांनी राज्य केलं.
▪️१२९४ मध्ये खिलजी अल्लाउद्दीन यांनी देवगिरी किल्ला ताब्यात घेऊन त्याचे दौलताबाद नामांतर केले व औसा ताब्यात घेतला.
▪️ बाराव्या शतकात यादव यांनी औसा वर राज्य केलं.
▪️ तेराव्या शतकात मुस्लिम राजवटीत हासन गंगु बहामनी यांनी औसा वर राज्य केलं.
▪️१४१० मध्ये बहामनी यांचा वजीर मुहंमद गवान यांनी हा किल्ला बांधण्यासाठी सुरू करून १४६६मध्ये पुर्ण केला.
▪️१४८१मध्ये गवान मुहंमद यांचा खून करण्यात आला.१४८२ मध्ये हा किल्ला राजा काशिद बारिश यांनी ताब्यात घेतला व 🛑 बारिशशाहि सुरू झाली.
▪️१५४८ मध्ये अहमदनगरचा ईबाद बुरान निजाम यांनी ताब्यात घेतला व 🛑ईबादशाहि सुरू झाली ती १६३६ पर्यंत !
▪️१६३७ ते १६७० मध्ये विजापूरच्या आदिलशाहीच्या ताब्यात हा किल्ला गेला व 🛑 आदिलशाही सुरू झाली. इ.स १६७० मध्ये छत्रपती शिवराय🚩 येथे आल्याचा उल्लेख सापडतो. १६७० ते १७२४ मध्ये येथे🛑 मुघलशाहि अस्तित्वात आली व हा किल्ला औरंगजेब यानी हस्तगत केला.
▪️त्या नंतर १९४८ पर्यंत हा किल्ला हैदराबादच्या निजाम यांच्या ताब्यात होता.
▪️बहामनी राजवटीत इ.स.१४६६ मध्ये महमूद गवान याची बहामनीचा मुख्य वजिर म्हणुन नियुक्ती झाली. आपल्या वजिरीच्या काळातच त्याने औसा किल्ला बांधला. खोलगट भागात असलेल्या या किल्याचा मुख्य भाग लपलेला दिसतो. अगदी जवळ गेल्याशिवाय हा किल्ला दिसत नाही. किल्यातील काही वास्तु व तटबंदीच्या काही भागावर तुर्क व युरोपियन स्थापत्य शैलीचा प्रभाव दिसतो. बहामनी नंतरच्या काळात दख्खन सल्तनत यांच्यातील संघर्षात हा किल्ला ठळकपणे दिसून आला. नंतरच्या काळात १०१४ हिजरी मध्ये मलिक अंबरने ते ताब्यात घेतले आणि त्याचे नाव ‘अंबारापूर’ असे ठेवले जे नंतर अमरापूर असे बदलले गेले.
हा किल्ला चारही बाजूंनी उंच जमिनीने वेढलेल्या उदासीनतेत वसलेला आहे जेणेकरून त्याच्या सर्वोच्च बिंदूवरून खूप अंतरावरुनही जवळ येत असलेल्या सैन्याचे दर्शन घेता येते आणि किल्ल्याचे मुख्य भाग नंतरच्या भागापासून लपलेले राहतात.
जवळजवळ चौकोनी आकाराच्या, किल्ल्याला सुमारे ३६.५८ मीटर (१२०फूट) रुंदीचा खंदक किंवा खंदक (खंदक) आहे, आता जवळजवळ कोरडा आहे. किल्ल्याची एक नजर आहे, एक राखून ठेवणारी भिंत, झाकलेला मार्ग, दुहेरी तटबंदी आहे ज्यात भव्य बुरुज आहेत, जे बहुतेक अर्धवर्तुळाकार आहेत मोठ्या तोफेने. यापैकी काही बंदुकांवर आदिल साही आणि निजाम साही राजांच्या सेवेत असलेल्या तुर्की अभियंत्यांची नावे आहेत. सध्या किल्ल्याच्या पहिल्या आतील प्रवेशद्वाराला लागून असलेल्या तटबंदीच्या वर्तुळाकार बुरुजावर कर्नल मेडोज टेलरने बांधलेली अलीकडची बारादरी वगळता कोणत्याही नोंदीच्या इमारती नाहीत.
संरक्षक खोल्यांच्या दगडी दगडी बांधकामात काही खराब क्षुल्लक नीलगारी शिलालेख बसवलेले आहेत. त्यापैकी एकावर मुर्तझा निजाम शाह यांचे नाव आणि १५२९ ची तारीख आहे. इतर वास्तूंव्यतिरिक्त, नेहमीच्या पाण्याचा महाल उध्वस्त अवस्थेत आहे, आता वापरात नसलेल्या काही मोठ्या विहिरी आहेत, एक मशीद आणि एका सय्यद सादातचा दर्गा आहे.
किल्ल्याच्या बाहेर एक जुनी जामा मशीद आहे आणि प्रार्थना कोनाड्यात पर्शियन भाषेतील दोन शिलालेख आहेत, ज्यात सम्राट औरंगजेब आणि मशिदीचा निर्माता सोहराब खान यांची नावे आहेत. हे १६८० मध्ये बांधले गेले. अतिशय भव्य व दिव्य असा हा किल्ला पाहण्यासाठी कमीत कमी एक दिवस लागतो. लातूरला गेल्या नंतर या किल्ल्याला शिवप्रेमी व इतिहास अभ्यासक यांनी अवश्य भेट द्या.
जय हिंद! जय महाराष्ट्र!