चामोर्शी तील ‘राष्ट्रीय स्मारक’ मार्तंडेश्वर महाराष्ट्रातील खजुराहो !

Share Post

महाराष्ट्रातील खजुराहो !
स्थापत्यकलेचा अद्भुत नमुना !
गडचिरोली चामोर्शी तील ‘राष्ट्रीय स्मारक’ मार्तंडेश्वर !

– डॉ.संजीव लिंगवत,वेंगुर्ले,सिंधुदुर्ग, 9421268268
सदस्य, महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक व पर्यटन मंत्रालय,
महावारसा समिती, सिंधुदुर्ग.

काल सकाळी सिंधुदुर्गहुन रात्री मुंबई गाठली व रात्री मुंबईतुन विदर्भ एक्सप्रेसने सकाळी नऊ वाजता नागपूर गाठलं . एस्.टी. कॅन्टिन मध्ये चर्रि पोहे व चहा घेऊन लगेच गडचिरोली कडे प्रस्थान केलं.दुपारी एक ते दिड वाजता गडचिरोली स्थानकावर पोहोचलो. जेवायला वेळ कुठे होता? रात्री पर्यंत चंद्रपुर गाठायच होतं , त्यामुळे गडचिरोली एस्. टि. कॅन्टीन मध्ये एक तर्री सामासा घेतला व लगेच चामोर्शी बस पकडली व बरोबर तीन वाजता चामुर्ली ला पोहोचलो. पुढे रिक्षा करून मार्तंड गावातील राष्ट्रीय पुरातत्व विभागाने राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केलेल्या मार्कंडेय मंदिरात पोहोचलो.

मार्कंडा हे भारतातील महाराष्ट्र राज्याच्या नागपूरपासून २१६ कि.मी. दूर असलेले एक गाव आहे. ते वैनगंगा नदीच्या काठावर वसलेले आहे. या गावाजवळ दक्षिणवाहिनी वैनगंगा वळसा घेउन उत्तरवाहिनी होते. या गावातील मंदिरांना विदर्भातील खजुराहो मानतात. ती मंदिरे चंद्रपूर -मूल -चामोर्शी रस्त्यावर आहेत. येथे नागपूर नागभीड या राज्य मार्ग क्र.९ ने ही मूल या गावापर्यंत जाउन मूल-चामोर्शी रस्त्याने मार्कंड्यास जाता येते. मूल ते मार्कंडा हे अंतर सुमारे २७ कि.मी.येते. ही जागा दुर्लक्षित आहे. या गावी सुमारे २३ मंदिरांचा समूह आहे. इ.स. १८७३ मध्ये कनिंगहॅम यांनी या मंदिरांकडे जगातील लोकांचे लक्ष वेधले. त्यांनी नोंदल्याप्रमाणे येथे २४ मंदिरे होती.सन १७७७ च्या सुमारास येथे वीज पडून देवळाचे बरेच नुकसान झाले .

2

अशी भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या अहवालात नोंद आहे. सन १९२४-१९२५ चे सुमारास आणखी काही मंदिरे कोसळली. सध्या तेथे दखल घेण्याजोगी १८ मंदिरे आहेत. यांत मार्कंडऋषी,(ज्यांचेवरून या गावास ‘मार्कंडा’ हे नाव पडले)मृकंडुऋषी, यम, शंकर आदि मंदिरे प्रमुख आहेत. या मंदिरांचा उभारणीकाळ ११ वे शतक वा त्यानंतरचा असावा असे चंद्रपूर येथील संशोधक गो.बं. देगलूरकर यांचे मत आहे. येथील मंदिरांच्या भिंतींवर अनेक देवदेवतांची तसेच विविध सुरसुंदरींची चित्रे कोरलेली आढळतात.

4

सुमारे आठव्या ते दहाव्या शतकात राष्ट्रकुल राजा तिसरा गोविंद यांनी हि मंदिरे बांधली असावीत अस इतिहासकार डॉ. मिराशी सांगतात , तर त्याच कालावधीत उत्तर कलचुरी यांची राजवट या भागात असल्याने त्यांनी हे मंदिरे बांधली असावीत असाही काही इतिहासकार यांचा तर्क आहे. चंदेल राजवंश यांच्या काळात खजुराहो सारखी अद्भुत कला जोपासली गेली होती.

त्यि काळातत प्रबोधचंद्रोदय, कर्पुर भंजरी, काव्य मिमांसा, विद्या शलभंजिका सारखे ग्रंथ पण लिहिले गेले.

मार्कंडेय हे हिंदू साहित्यात वैशिष्ट्यीकृत ऋषी आहेत. ते ऋषी मृकंदा आणि त्याची पत्नी मनस्विनी यांचा मुलगा असुन त्यांनी घोर तपश्चर्या करून शंकरांना प्रसन्न करुन घेतले, व या बुध्दीवान ऋषीचा जन्म झाला जे अल्पायुषी होते त्यांनी या मंदिराची संकल्पना मांडली असहि सांगितले जाते. त्यांच्या जन्मा बाबतीत अनेक आख्यायिका प्रसिद्ध आहेत.

मार्तंडेश्वर
मार्तंडेश्वर

भारतीय संस्कृतीमध्ये नद्यांना खूप महत्त्व असल्याने… वैनगंगा या उत्तरवाहिनी नदिच्या काठावर मार्कडा हे तीर्थक्षेत्रे विकसित झालेल दिसतात.

उत्तर हिंदुस्थानी पद्धतीचे आणि खजुराहो मंदिराच्या तोडीस तोड असलेले मार्कंडा हे देवस्थान विदर्भात गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यात आहे. संथपणे वाहणारी उत्तरवाहिनी वैनगंगा आणि तिच्या तिरावरची अप्रतिम स्थापत्यशैली असलेली ही मंदिरे, बघता क्षणीच मनाला भुरळ घालणारी आहेत. मार्कंडा येथील देवालये दक्षिणोत्तर १९६ फूट लांब आणि पूर्व-पश्चिम १६८ फूट लांब अशी काटकोनात वसलेली आहेत. सभोवती ९ फूट उंचीची भिंत आहे आणि काटकोनी आकारामध्ये एकूण १८ देवळे आहेत. या देवळांपैकी मार्कंडेय ऋषींचे देऊळ, यमधर्म आणि महादेवाचे मंदिर हे उत्कृष्ट शिल्पकृतीचे नमुने आहेत. या प्रकारात मार्कंडेय ऋषी, नंदिकेश्वर, यमधर्म, भृशुंडीमुनी, मृत्युंजय, विठ्ठल रखुमाई, उमाशंकर, दशावतार, शक्तिदेवी, हनुमान, गणेश, शंकर, विश्वेश्वर, भीमेश्वर, वीरेश्वर इ. मंदिरे आहेत. या मंदिराकडे बघतांना आपण खजुराहोची मंदिरे बघत असल्याचा भास होतो.

अत्यंत बारीक नक्षीदार कलाकुसर हे या मंदिरांचे वैशिष्ट्य आहे. मानवी जीवनाच्या विविध छटा, आणि अनुभवांचे मूर्तिमंत चित्रण या मंदिरांमध्ये करण्यात आले आहे. मानवी आकृत्या चितारतांना चेहऱ्यावरचे हावभाव ठळकपणे चित्रित केले आहेत. ‘मैथुन शिल्पे’ हे मार्कंडा मंदिरांचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. कलावंतांनी जीवनाचा सर्व अंगांनी केलेला विचार बघून आपण थक्क होतो. मार्कंडा मंदिरांना ‘विदर्भाची काशी’ म्हणतात ते उगाच नाही.

3

या मंदिरांची प्रत्येक मूर्ती डोळ्यात साठवून ठेवावी अशीच आहे. पण त्यातही एके ठिकाणी असलेली एका युवतीची मूर्ती नितांत सुंदर म्हणावी अशी आहे. तिच्या हातात आंब्याची डहाळी आहे. बहुधा, ती ‘आम्रपाली’चे द्योतक असावी. या मूर्तीवरचे अलंकार, वस्त्रे, सगळेच देखणे आहे. एवढेच नाही, तर आंब्याच्या डहाळीचे पान न् पान ठळकपणे जाणवते. आणि आपण आपोआपच या अनामिक शिल्पकारांपुढे नतमस्तक होतो.

मार्कंडाला महाशिवरात्रीला मोठी यात्रा असते. छत्तीसगड, मध्यप्रदेश आणि विदर्भाच्या इतर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर यात्रेकरू इथे दर्शनाला येतात. या काळात इथे लोकांची खूप वर्दळ असते. पण एरवी ही मंदिरे वर्दळीपासून काहीशी दूर आहेत. १५० वर्षापूर्वी या मंदिरावर वीज कोसळली होती. त्यामुळे मंदिराचे खूप नुकसान झाले आहे. थोडी पडझड झाली आहे. पण या मंदिरांचे देखणेपण आजही टिकवून आहेत. हजारो वर्षापूर्वी बांधलेली ही मंदिरे भारतीय शिल्पकृतीचे देखणे उदाहरण आहे.

मार्कंडा येथील एका मंदिरावरील कोरीवकाम अद्भुत आहे. खरं तर एक दिवस येथे काढता येईल. वैनगंगा काठावरील हे नयनरम्य व डोळ्याचे पारणे फेडणारे मंदिर पाहून सायंकाळी सात वाजता चामुर्लीया तालुक्यातील गावात आलो. अतिशय खराब रस्त्याने एसतरी मुल तालुका ठिकाण गाठलं. जे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राष्ट्रीय नेते गडकरी यांचे मुळ गाव आहे. मुल मार्गे चंद्रपुरात येईपर्यंत रात्रीचे दहा वाजले. भुक पण खूप लागलेली, दमलो पण होतो, त्यामुळे वाटेतच हाँटेल रसराज मध्ये महाराजा थाली जेवुन विजयालक्ष्मी रेसीडेन्सीवर दाखल झालो ‌ दोन संपूर्ण दीवस व एक रात्रीचा जवळपास दिड ते दोन हजार किलोमीटरचा प्रवास संपवून शेवटी आंघोळ करून अंथरूण धरलं.